टीव्हीवरील सायरन बंद करा भारत सरकारच्या माध्यमांना सूचना

 टीव्हीवरील सायरन बंद करा भारत सरकारच्या माध्यमांना सूचना

नवी दिल्ली, दि. १० : केंद्रीय गृहमंत्रालयाने आज एका अधिसूचनेद्वारे टीव्हीवरील बातम्या आणि कार्यक्रमांदरम्यान सायरनचा आवाज लावू नये अशा स्पष्ट सुचना दिल्या आहेत. भारत- पाक तणाव स्थितीबाबत वृत्तवाहिन्यांवर सुरु असलेल्या अतिरंजित वार्तांकनात सायरनचा आवाज वारंवार टाकला जातो आहे. यामुळे एखादे वेळेस खरोखरच हवाई हल्ला झाला आणि त्यावेळी सतर्कतेसाठी सायरन वाजवण्यात आल्यास लोकांना त्याचे गांभीर्य लक्षात येणार नाही. त्यामुळे टिव्हीवरील कार्यक्रमांमध्ये सायरन वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भारत सरकारने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. १९६८ च्या नागरी संरक्षण कायदा कलम ३ (१) (w) (i) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, सर्व माध्यम वाहिन्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये नागरी संरक्षण हवाई हल्ला सायरनचा आवाज समुदायाला शिक्षित करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही उद्देशाने वापरण्यापासून परावृत्त करावे.

२. सायरनचा नियमित वापर नागरिकांमध्ये हवाई हल्ला सायरनबद्दल संवेदनशीलता कमी करू शकतो आणि नागरिक प्रत्यक्ष हवाई हल्ल्यांदरम्यान मीडिया चॅनेलद्वारे वापरल्या जाणाऱ्या नियमित बाबी म्हणून गैरसमज करू शकतात.

३ नागरी संरक्षण कायदा, १९६८ च्या संदर्भात नागरी संरक्षण तयारी वाढवण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *