भारत, U-19 महिला T-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल

 भारत, U-19 महिला T-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल

पोचेस्ट्रूम,दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आफ्रिकेतील पोचेस्ट्रूम येथे सुरू असलेल्या U 19  T 20 महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय मुलींनी दिमाखदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विजया बरोबरच भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

आज झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 8 गडी गमावून 107 धावा केल्या. निताशा 3 धावा करून नाबाद परतली. तत्पूर्वी, जॉर्जिया प्लिमर 35 आणि इसाबेला जॉर्ज 26 धावांवर बाद झाली. भारताकडून पार्श्वी चोप्राने 3 बळी घेतले. भारतीय संघाने 108 धावांचे लक्ष्य 14.2 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले.

भारतीय संघाकडून श्वेता सेहरावतने (61 धावा) अर्धशतक झळकावले. त्याच्याशिवाय सौम्या तिवारीने 22 आणि कर्णधार शेफाली वर्माने 10 धावांचे योगदान दिले.

स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी सायंकाळी 5:15 वाजता पोचेस्ट्रुममध्येच होणार आहे.

SL/KA/SL

27 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *