मुंबईत गेल्या १० वर्षात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ

मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरामध्ये गेल्या 10 वर्षात (2013 ते 2022), बलात्कार आणि विनयभंगाच्या
गुन्ह्यात वाढ झाली आहे. नोंदवलेल्या बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 391 वरून 901 ने म्हणजे 130 टक्यांनी वाढ झाली आहे.
तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये 1 हजार 137 वरून ती 2 हजार 329 म्हणजे 105 टक्यांनी वाढ झाली असल्याचे प्रजा फाऊंडेशने प्रसिद्ध केलेल्या अहवाल म्हटलं आहे.
मुंबई शहरातील गुन्हेगारीचे चिंताजनक वास्तव पुढे आणणारा ‘मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती 2023’ हा प्रजा फाऊंडेशनचा अहवाल आज प्रेस क्लब मध्ये प्रकाशित करण्यात आला.
पोलीस प्रशासनाने या वास्तवाची गंभीर दखल घेऊन पोलीस व कायदा व्यवस्थेतील सुधारणांना प्राधान्य दिले पाहिजे असे या अहवालात म्हटले आहे . या अहवालामध्ये पोलीस यंत्रणेतील सुधारणा, गुन्हेगारीचे स्वरूप व प्रमाण, बालकांविरुद्धचे लैंगिक गुन्हे (पोक्सो) आणि सायबर गुन्हे यांचे वाढते आणि सायबर गुन्हे याचे वाढते प्रमाण, फोरेन्सिक विभाग आणि पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळ या मुद्द्यांची तपशीलवार चर्चा केलेली आहे.
सध्या मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत, शिवाय नोंदणीकृत मुद्यांमध्ये मोठी वाढडी होत असून या चिंताजनक परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरचा आहे. गेल्या 10 वर्षात, म्हणजे 2013 से 2022 या दरम्यान, बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्हांमध्ये अनुक्रमे 130% ने (391 वरून 901) आणि 105% ने (1,137 वरून 2.329) वाढ झालेली आहे. याखेरीज दाखल झालेल्या एकूण बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी 63% (615) केसेस अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आहेत. या केसेस लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 (POCSO) खाली दाखल झाल्या आहेत ही माहिती मुबई पोलीसांच्या वेससाईटवर दिलेली आहे, असे प्रजा फाऊंडेशनच्या संशोधन व विश्लेषण विभागाचे प्रमुख योगेश मिश्रा यांनी सांगितले.
शिवाय मुंबईच्या पोलीस दलात 30% मनुष्यबळाची कमतरता आहे (ही आकडेवारी जुलै 2023 पर्यंतची आहे) तर गुन्ह्याच्या तपासकार्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी पदावरील (पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षण, पोलीस उप-निरीक्षक) मनुष्यबळाची 22 टक्के कमतरता आहे. पदे रिक्त असल्याने मनुष्यबळ अपुरे आहे, ज्याचा परिणाम तपासकार्यावर होतो. 2022 च्या अखेरपर्यंत, पोस्को खाली दाखल गुन्ह्यांपैकी 73 टक्के केसेसचा तपास प्रलंबित होता. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरोचा 2022 चा अहवाल अद्याप प्रकाशित झाला नसल्याने 2022 मधील नोंदवलेल्या गुन्हेगारी केसेसच्या प्रलंबित तपासाचे प्रमाण अद्याप स्पष्ट नाही, असे प्रजा चे सीईओ मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.
जगभरात सगळीकडेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून मुंबईही त्याला अपवाद नाही . मुंबईमध्ये 2018 ते 2022 या दरम्यान त्यात 243% ने वाढ झाली आहे, म्हणजेच त्यांची संख्या 1,375 वरून 3,723 पर्यंत वाढली आहे. 2022 मध्ये केडीट कार्ड घोटाळे/फसवणुकीचे सायबर गुन्हे सर्वाधिक नोंदवलेले असून त्यांचे प्रमाण 657% से (461 वरून 3,490) वाढले आहे.
या गुन्ह्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठीची पाऊले उचलली आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर विभाग सुरू केले आहेत, तरीही 2022 मध्ये नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांमधील गुन्हेगार सापडण्याच प्रमाण केवळ 8 टक्के आहे. यावरून स्पष्ट दिसते की सायबर गुन्ह्यांच्या जलद तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आवश्यक तांत्रिक कोशल्ये विकसित करण्याची व क्षमतावृद्धीची आवश्यकता आहे”, असे मिश्रा यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना सांगितले.
SW/KA/SL
23 Nov. 2023