जाणून घ्या IPL च्या नियमातील महत्त्वाचा बदल

 जाणून घ्या  IPL च्या नियमातील महत्त्वाचा बदल

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाची चाहुल लागत असताना आता देशात IPL चे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठीच्या लिलावाची देखील जोरदार तयारी सुरू आहे. त्यात आज आयपीएल  गव्हर्निंग काउंसिलमध्ये दीर्घ चर्चेनंतर स्पर्धेसाठी एक

महत्त्वपूर्ण नियम समाविष्ट करण्यात आला आहे.आयपीएलमध्ये आता नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधार ११ ऐवजी १५ खेळाडूंची नावे सांगतील.

त्यापैकी ११ खेळाडू हे प्लेइंग ११ मध्ये असतील तर अन्य चार खेळाडू हे सबटीट्यूट असतील. या चार पैकी कोणताही एक खेलाडू मॅच सुरू असताना प्लेइंग ११ मधील कोणत्याही खेळाडूची जागा घेऊ शकेल. संबंधित खेळाडूला गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करता येईल.

या सबटीट्युट खेळाडू संघाच्या डावाच्या १४व्या ओव्हरपर्यंतच संघाकडून खेळू शकेल. त्यानंतर मात्र असा सबटीट्यूट घेता येणार नाही.

याआधी  हा नियम याआधी सयद मुश्ताक अली ट्रॉफीत लागू करण्यात आला होता. त्यामुळे सामन्यातील रंजकता वाढल्याचे दिसून आल्याने हा नियम आता IPL 2023 साठी लागू करण्यात आला आहे.

SL/KA/SL

2 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *