उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत गद्दारीच केली नसती तर

नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत गद्दारीच केली नसती तर भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याकडे घेतले नसते असे मत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज व्यक्त केले. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणूकीत भाजप सामुहिक नेतृत्व घेऊन निवडणूक लढणार असून या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णयही सामुहिकरित्या सोडविण्यात येईल असे तावडे यांनी यावेळी सांगितले. भाजप ने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलविली असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष हे लोकसभेचा 400 जागांवर आहे त्यात महाराष्ट्रात 48 जागांचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँगेसच्या हेकेखोर भूमिकेमुळे इंडिया आघाडीत फूट पडली असून येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे सहकारी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची त्यांची मानसिकता तयार झाली आहे. ते सर्व वेगवेगळे लढतील आणि त्याचा फायदा भाजपला होईल असे मतही तावडे यांनी यावेळी व्यक्त केले.
ML/KA/SL
16 Dec. 2023