लोकसभा निवडणुका झाल्या तर आम्हाला चाळीस जागा मिळतील

 लोकसभा निवडणुका झाल्या तर आम्हाला चाळीस जागा मिळतील

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आता जर लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात महाविकास आघाडीला चाळीस जागा मिळतील असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.If the Lok Sabha elections are held, we will get forty seats

आतापर्यंत आम्ही भाजपा ला पालखीत बसवून पंचवीस वर्षे फिरवले मात्र त्यांनी आम्हाला कायमच भोई म्हणून ठेवण्याचा प्रयत्न केला अशी टीका त्यांनी यावेळी केली. आमच्याकडून काही दगड बाहेर पडले म्हणून हे हिरे मिळाले असेही ठाकरे म्हणाले.

अद्वय हिरे यांनी केवळ नाशिक पुरते मर्यादित न राहता त्यांनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी घ्यावी असे सांगत उध्दव ठाकरे यांनी पुढील पंधरा दिवसात आपण मालेगाव इथे जाहीर सभा घेऊ असे यावेळी जाहीर केले.

ML/KA/PGB
27 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *