प्रशासनाची नजर चुकवत दररोज शेकडो ब्रास वाळूची चोरी…

रत्नागिरी दि २१:– रत्नागिरी जिल्ह्यात वाळू बंदी आहे. तरी देखील प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत रात्रीच्या सुमारास वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरू आहे. जिल्ह्यातील करजुवे, डिंगणी, गोळकोट, मालदोली, चिवेली, म्हाप्रळ, पलांजे आदी ठिकाणच्या नदी खाडी भागात बिन बोभाटपणे वाळू चोरी सुरू आहे. रात्रीच्या अंधारात वाळू माफियांकडून शेकडो ब्रास अवैधपणे वाळूची उत्खनन करून एकाबाजूला शासनाचा महसूल बुडवला जात आहे तर वाळू उत्खननामुळे पर्यावरणाला देखील धोका निर्माण होत आहे. दरम्यान प्रशासनाकडून वाळू चोरी रोखण्यासाठी गस्तीपथके नेमण्यात आली आहेत. मात्र गस्तीपथकाला चकवा देत वाळू चोरी सुरू आहे.