उच्च न्यायालयाने फेटाळली प्रकाश आंबेडकरांची याचिका

 उच्च न्यायालयाने फेटाळली प्रकाश आंबेडकरांची याचिका

मुंबई, दि. २५ : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

न्यायालयाने म्हटले, वरील तथ्यांच्या प्रकाशात, आम्हाला शंका नाही की ही याचिका फेटाळली पाहिजे. त्यानुसार ती फेटाळली जात आहे. याचिकेवर सुनावणी करण्यात या न्यायालयाचा एक संपूर्ण दिवस वाया गेला. असे असले तरी आम्ही कुठलेही शुल्क लावणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबईचे रहिवासी असलेले याचिकाकर्ते चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर विचार करण्यास न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नकार दिला. खंडपीठाने म्हटले आहे की याचिकेने न्यायालयाचा वेळ वाया घालवला, परंतु शुल्क आकारले नाही.

याचिकेतील दावाविधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमधील जाहीर झालेले निकाल रद्द करावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयात केली. अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी 6 वाजताच्या अधिकृत मतदान वेळेनंतर जास्तीचे मतदान झाल्याचे अधोरेखित करण्यात आले होते, विशेषतः अंतिम मुदतीनंतर 75 लाखांहून अधिक मते नोंदविण्यात आली, असा दावा करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, त्यांनी 90 हून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झालेल्या आणि मोजलेल्या मतांमधील तफावतीकडे लक्ष वेधले.

प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
चेतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अँड ऑरस या खटल्याचा निकाल आला आहे. खंडपीठाने याचिका फेटाळली आहे. निकाल अपलोड झाल्यानंतर आणि तो कोणत्या कारणांवर फेटाळण्यात आला आहे हे वाचल्यानंतर, मी माझी प्रतिक्रिया देईन. मी उद्या सकाळी 11.30 वाजता व्हीबीएच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेईन.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *