हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली 143 क्युमेक्सने विसर्ग सुरू

 हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली 143 क्युमेक्सने विसर्ग सुरू

जळगाव दि २७– जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज धरणात एकूण 64.95 टक्के पाणीसाठा असून पाणीपातळी 211.380 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणाच्या पाण्यात आवक वाढल्याने धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या 143 क्युमेक्स (सुमारे 5050 क्युसेक्स) दराने पाणी खाली सोडले जात असून चार दरवाजे प्रत्येकी 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत. विसर्गामुळे तापी नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *