पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारी!

 पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारी!

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठू नामाच्या जयघोषणात संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूर येथे पोहोचत आहे. यातच एका गिर्यारोहकाने पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारीची परंपरा सुरू केली आहे. जालना ते पंढरपूर सायकलवर प्रवास करत या व्यक्तीने 3000 सीडबॉल सोबत घेत प्रवासात रोपण करत गेला.

हे सीड्स बॉल रस्त्याच्या कडेला फेकल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात ते जमिनीत रुजतात आणि देशी झाडे रस्त्याच्या दुतर्फा उगवतात. एकंदरीतच अशा पद्धतीने ते पर्यावरणाला संरक्षित करण्याचे कार्य करत आहेत.

Harit Wari for environmental conservation!

ML/ML/PGB
17 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *