गोंदियात परतीच्या पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान

 गोंदियात परतीच्या पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान

गोंदिया दि २६ -:- गोंदिया जिल्यात परतीच्या पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत देण्याची मागणी केली आहे.

गोंदिया जिल्यात या वर्षी तब्बल १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. याआधीच्या अवकाळी पावसामुळे धान पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकरी नुकताच त्या संकटातून सावरत असतानाच परतीच्या पावसाने पुन्हा धक्का दिला आहे. कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या धान पिकावर पावसाच्या पाण्याने आडवी झालेली शेती, सडलेले धान आणि उद्ध्वस्त झालेले शेत पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हताशा दिसत आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “हाताशी आलेला घास पावसाने हिरवला. सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी.” प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र शेतकरी सरकारकडून त्वरित मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *