बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी ठिय्या आंदोलन

 बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी ठिय्या आंदोलन

मुंबई दि.15( एम एमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणाला घातक असणारा प्रदुषणकारी बारसू रिफायनरी प्रकल्प कायमचा हद्दपार करण्यासाठी आणि निसर्गाला उधवस्त करणारे कोकणातील विनाशकारी प्रकल्प हटवण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभे केले जाणार आहे. त्यासाठी बारसू सोलगाव पंचक्रोशीतील कष्टकरी जनते सोबतच महाराष्ट्रातील प्रागतिक पक्ष आणि संघटनांची व्यापक आघाडी या आंदोलनात उतरली आहे. याची सुरवात म्हणून मंगळवार 18 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन होणार आहे.

या आंदोलनात बारसू सोलगाव पंचक्रोशीतील जन्तेसोबतच महाराष्ट्रातील विविध जन संघटनांच्या नेतृत्वाखाली लढणारी जनता, मुंबईकर कोकणवासी, पर्यावरण प्रेमी, लेखक, कवी, अभ्यासक, विचारवंत, कलावंत या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघर्ष समिती व बारसू रिफायनरी विरोधी राज्यव्यापी लढा समितीतर्फे समाजसेवक डॉ.भारत पाटणकर यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी सत्यजित चव्हाण,वैभव कोळवणकर, अमोल बोळे,दिपक जोशी, कॉ .प्रकाश रेड्डी, संपत देसाई,अंकुश कदम,नरेंद्र जोशी,नितीन जठार ,विजय दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉ.भारत पाटणकर म्हणाले या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबई सह कोकण वासियांना महाराष्ट्रात अशी रिफायनरी प्रकल्प कुठे नकोच,अशी भूमिका जनतेने घेतले आहे .ईंधन व विज निर्मितीवर परिणाम करणारे कोकण उदवस्त करण्याचे कारणस्थान आहे. हा लढा प्रदूषण विरोधात असलेल्या सर्व कोकण वासियांचा आहे .

निसर्ग संपत्ती उध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे . २००७ पासून प्रकल्प बाधित करण्यासाठी योजना तयार झाली आहे.याला तंत्र वैज्ञानिक पर्यावरणाचा पर्याय आहे, शास्त्रज्ञांना बोलवून तज्ञांची बैठक बोलवा , ब्रिटिशाप्रमाणे सरकार जनतेला लुटत आहे सरकारने १८ तारखेच्या अगोदर चर्चा करावी असे पाटणकर यांनी सांगितले.

आम्हाला विकास हवा, रोजगार हवा पण तो निसर्गाला उधवस्त करणारा आणि माणसांची थडगी बांधून त्यावर उभारलेला नको हे आपल्याला संघटीतपणे जोरदार आवाजात आता सांगावेच लागणार आहे. म्हणूनच बारसू रिफायनरीच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊया, एका सुरात एका आवाजात बोलूया. बारसू रिफायनरी कायमची रद्द झालीच पाहिजे पण त्याचबरोबर कोकणच्या समृध्द विकासासाठीपर्यावरण संतुलित विकासाचे पर्यायी धोरण राज्य सरकारने घेतलेच पाहिजे यासाठी होणाऱ्या व्यापक आंदोलनाचा भाग म्हणून १८ जुलै रोजी आझाद मैदान येथे हे ठिय्या आंदोलन होत आहे.

या आंदोलनात जे कोणी भूमिपुत्र, गावकरी, चाकरमानी, कट्टर कोकणी, कोकणावर कविता लेख लिहिणारे लेखक कवी, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणवादी अशा सर्वांनी या लढ्याला आपली बुध्दी, बळ, पैसा, सहभाग देऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन डॉ पाटणकर यांनी केले आहे.

SW/KA/SL

15 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *