गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ…

नाशिक दि ४– जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र कालपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून गोदावरी नदीला देखील पूर आला आहे.

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरातील अनेक मंदिरांना गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडला आहे. तर गोदाघाट परिसरामध्ये जे छोटे पूल आहेत, ते देखील पाण्याखाली गेले आहेत.

गंगापूर धरणातून सध्या १०,०९८ क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, दुपारनंतर धरणातून साधारण १ हजार पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *