गहिनी महाराजांची पालखी पंढरपूर कडे…

 गहिनी महाराजांची पालखी पंढरपूर कडे…

बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गहिनी प्रसादे निवृत्ती दातारे  ,ज्ञानदेवा सार चोजविले , संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी च्या समारोपात गहिनीनाथांचे महत्व सांगितले आहे.नाथ  संप्रदायातील गहिनीनाथ हे एक नाथ. यांच्या नावाने राज्यातील नाथ संप्रदायातील एकमेव पालखी दिंडी ची परंपरा अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावरून सुरु आहे.या पालखी दिंडी हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने टाळ मृदंगाच्या गजरात हा प्रस्थान सोहळा पार पडला.

वारकरी संप्रदायाची परंपरा महाराष्ट्रात आहे.याच संप्रदायाचा  मूळ संप्रदाय म्हणून नाथ संप्रदायाकडे पाहिले जाते. या नाथ 
संप्रदायाची दिंडी अनेक वर्षापासून वारकर्यांना घेऊन पंढरीला जाते. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ 
गडावरून ह्या दिंडीचे 
 पंढरीकडे प्रस्थान झाले.
नाथांचे शिष्य असलेले 
संत वामनभाऊ यांनी या पालखीची सुरुवात सुमारे 125 वर्षपूर्वी केली . आजही ही परंपरा सुरु आहे. 

 बीड जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वतरांगांमध्ये नाथ संप्रदाय पहावयास मिळतो.नाथांच्या समाधीचे पूजन करून पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. त्यानंतर  पालखीने प्रस्थान केले . या
पालखीमध्ये
बीड जिल्ह्यातील गहीनीनाथ यांच्या आणि वामनभाऊ यांच्या ५० हजारहून अधिक अनुयायांचा समावेश आहे. शिस्त बद्ध आणि सर्व समावेशक असलेल्या दिंडीचे नियोजन या गडाचे महंतविठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. 
ऊसतोडणी कामगारांचा हा जिल्हा असल्याने दिंडी मध्ये महिला, ऊसतोडणी कामगार यांची संख्या अधिक आहे.

ML/KA/PGB
18 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *