कोल्हापूरात भरधाव कारने चार दुचाकींना चिरडले, तिघांचा मृत्यू

 कोल्हापूरात भरधाव कारने चार दुचाकींना चिरडले, तिघांचा मृत्यू

कोल्हापूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरातील सायबर चौकात आज दुपारी एका भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले कारचे चालक हे कोल्हापुरातील माजी प्रभारी कुलगुरू असल्याचं समोर आलं आहे. वसंत चव्हाण असं माजी प्रभारी कुलगुरूंचे नाव असून त्यांची तब्येत बरी नसतानाही ते गाडी चालवत असल्याची माहिती आहे. या अपघातात वसंत चव्हाण यांचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी २.२५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. एका हुंडाई सॅन्ट्रो कारने सायबर चौकात चार दुचाकींना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

कोल्हापुरातील सायबर चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. राजारामपुरी आणि शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेजला जोडणाऱ्या या चौकात दिवसा मोठी गर्दी असते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, चौकात वाहने हळहळे पुढे जात आहेत. मात्र, काहीच क्षणात भरधाव वेगात आलेली कार समोरील वाहनांना जोरात धडकून पुढे जाऊन पलटी होते. त्यावेळी दुचाकीवरील दोन-तीन जण हवेत उडल्याचे दिसतात.

SL/ML/SL

3 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *