दरड कोसळून ४८ घरे दबली, १६ जणांचा मृत्यू

 दरड कोसळून ४८  घरे दबली, १६  जणांचा मृत्यू

अलिबाग, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यात चौक , खोपोली इथे मध्यरात्री इरसालवाडी इथे आदिवासी वस्तीवर दरड कोसळली असून ४८ घरे त्याखाली दबली आहेत , मदत आणि बचावकार्य सुरू असून आतापर्यंत १०३ जणांना बाहेर काढण्यात आले तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या गावची लोकसंख्या २३४ असून अजून काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. त्यामुळे बचावकार्य सुरू राहणार आहे.

यावेळी पोलीस , एन डी आर एफ, अग्निशमन दल यासह सह्याद्रीचे दुर्गसेवक टीम, बजरंगदल कार्यकर्त्यांची टीम, कल्याण-बदलापूर ते खोपोली पट्टयातील हिंदू धर्माभिमानी आगरी-कोळी युवक, श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी एवढे ग्रुप, सामाजिक संस्था, समाज संघटना तिकडे बचावासाठी आले आहेत.

एनडीआरएफच्या जवानांनी आत्तापर्यंत १०३ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दरम्यान, दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंत माहिती हाती आली आहे. या गावची लोकसंख्या २३४ असून अजून अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. पाऊस सुरू असल्याने मदत मिळण्यास अडचण येत आहे. मुख्य रस्त्यापासून अडीच किलोमीटर वर ही वाडी आहे.

एनडीआरएफ, पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास १०० जणांची टीम घटनास्थळी दाखल असून मदत व बचावकार्य सुरू आहे. मुंबईहूनही एनडीआरएफच्या आणखी दोन टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेली माहितीनुसार या दुर्घटनेत १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे . या ठिकाणी एकूण ४६ घरे होती त्यात १७८ लोक राहत होते.

ML/KA/SL

20 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *