AIR India च्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट पतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली, दि. १९ : मुंबई: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर ७८७ विमानाच्या भीषण अपघातानंतर आता ड्रीमलायनर ७८७ च्या विश्वासार्हतेबद्दल विविध शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या मिनिटभरात अपघात झाला. त्यात २७४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर बोईंग कंपनीच्या ड्रीमलायनर ७८७ विमानाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. याबद्दल एअर इंडियात काम करणाऱ्या दोन माजी वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. विमानातील त्रुटी दाखवल्याबद्दल एअर इंडियाकडून आपली हकालपट्टी करण्यात आल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
बोईंग ड्रीमलायनर ७८७ मध्ये गेल्या वर्षी झालेल्या तांत्रिक बिघाडाची माहिती आम्ही दिली होती. पण आम्हाला जबाब बदलण्यास सांगण्यात आलं. त्यास आम्ही नकार दिला. यानंतर आम्हाला सेवेतून कमी करण्यात आलं, असा उल्लेख एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्यांनी पत्रात केला आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग ड्रीमलायनरच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी यासंदर्भात हस्तक्षेपाची विनंती केली आहे.
ड्रीमलायनरच्या दरवाज्यात त्रुटी होत्या. तो नीट काम करत नव्हता. विमानाचं दार केवळ मॅन्युअल मोडमध्येच उघडायचं. १४ मे २०२४ मध्ये मुंबईहून लंडनला जाणाऱ्या बी७८७ विमानात ही समस्या आलली होती. हिथ्रोमध्ये विमानाचं दार उघडताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागता होता, याचा उल्लेख मोदींना लिहिलेल्या पत्रात करण्यात आलेला आहे.