रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन..  

 रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन..   

बुलडाणा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतू जळालेल्या, नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे वीजपुरवठा नाही आणि त्यामुळे पाणी देता येत नाही याविरोधात काल रात्री शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

१५ दिवस, महिना – महिना रोहित्र मिळत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.. याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी काल सायंकाळी 7 वाजता आक्रमक भूमिका घेत बुलडाणा येथील महावितरणच्या मेन्टनन्स विभागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या मांडून मुक्काम आंदोलन सुरु केले.

शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळेपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली त्यामुळे महावितरण कंपनीने रात्रीच शेतकऱ्यांचे रोहित देण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळे रात्री 1 वाजता हे ठिय्या मुक्काम आंदोलन मागे घेण्यात आले…

ML/KA/PGB

20 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *