शेतकऱ्यांच्या तीनशे एकरवर वक्फ बोर्डाचा दावा …
लातूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यतल्या अहमदपूर तालुक्यातील १०३ शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाअसून तशा नोटिसा या शेतकऱ्यांना पाठवून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .
अहमदपुर तालुक्यातील तळेगावच्या १०३ शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ याचिका क्रमांक १७/ २०२४ अन्वये दावा केला आहे . त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिसींमध्ये वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरीत्या तळेगावातील १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या ७७ नोटिसा आल्या आहेत. यामुळे ७५ टक्के गाव भीतीखाली आहे. याप्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
येत्या 20 डिसेम्बर ला तारीख असून नियोजित तारखेला उपस्थित न राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील, असेही नोटिसीत नमूद केले आहे. वक्फ बोर्डाच्या या नोटिसीने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर आता थेट मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घालावे अन्यथा आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .
शेतकऱ्यांच्या तीनशे एकरवर वक्फ बोर्डाचा दावा …
ML/ML/PGB
8 Dec 2024