लग्न जुळावे म्हणून देवाला साकडे घालण्यासाठी शेतकरी तरुण काढणार पदयात्रा

 लग्न जुळावे म्हणून देवाला साकडे घालण्यासाठी शेतकरी तरुण काढणार पदयात्रा

मांड्या, कर्नाटक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभरात ग्रामीण भागात शेतकरी तरुणांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराच्या ओढीमुळे आणि शेती व्यवसायातील अनिश्चिततेमुळे मुली ग्रामीण शेतकरी तरुणांशी लग्न करण्यास फारशा राजी नाहीत.त्यामुळे शेतकरी तरुणांची लग्न या काळातील मोठा सामाजिक प्रश्न होऊ पाहत आहे.असेच वधू संकट कर्नाटकच्या ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. शेतकरी तरूणांना लग्न करण्यासाठी मुली मिळत नसल्याने तरुणांनी थेट देवाला साकडे घातले आहे. कर्नाटकातील अनेक तरुण शेतकरी मांड्या येथील एका मंदिरात देवाला साकडे घाणल्यासाठी पदयात्रा काढणार आहेत. दर आठ महिन्यांनी गावातील तरुण ही पदयात्रा काढतात. देवाला प्रार्थना करण्यासोबतच समाजात जनजागृती करण्यासाठी या पदयात्रा काढली जाते असे, येथील तरुण शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

शहरात मिळणारी चांगली जीवन शैली, आणि ग्रामीण भागात असलेल्या अपूऱ्या सुख सोईमुळे ग्रामीण भागात लग्न करण्यास आजकालच्या मुली नकार देत आहेत. यामुळे अनेक शेतकरी तरुणांचे लग्न खोळंबली आहेत. कर्नाटकच्या ग्रामीण भागात ही एक मोठी समस्या झाली आहे. अनेक तरुण हुंडा न घेता लग्न करण्यास तयार आहेत. मात्र, असे असतांनाही अनेक मुली लग्न करण्यास नकार देत असल्याने तरुण हवालदिल झाले आहेत.आम्ही हुंडा मागत नाही. आम्ही मुलींची काळजी घेण्यास तयार आहोत. असे असतांना देखील मुली तसेच पालक शेतकरी कुटुंबातील तरूणांना मुली देण्यास नकार देत आहेत, असे एका पीडित शेतकरी तरुणाने सांगितले.

समाजातील या गंभीर समस्ये बाबत येत्या डिसेंबरमध्ये, कर्नाटकातील मंड्या येथील पदवीधर शेतकरी अखिल कर्नाटक ब्रह्मचारीगला संघाच्या बॅनरखाली आदिचुंचनगिरी मठावर पदयात्रा काढणार आहे. समाजात जनजागृती करण्यासोबतच लग्न होण्यासाठी हे तरुण देवाला साकडे घालणार आहेत. यापूर्वी येथील तरुणांनी फेब्रुवारी महिन्यात चामराजनगर जिल्ह्यातील एमएम हिल्स मंदिरात पूजा केली होती.

SL/KA/SL

14 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *