पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना फडणवीस सरकार करणार ५० लाखांचे अर्थसहाय्य

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिच्यासह प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.