हाती घेतलेली सर्व कामे अधिक गतीने पूर्ण करून जनतेला न्याय देऊ

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्ही जी कामे गेल्या अडीच वर्षाच्यापूर्वी हाती घेतली होती त्याला अधिक गती देऊन राज्याला विकासाकडे घेऊन जाईल यातून चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वांगीण प्रगतीसाठी साठी अनेकविध प्रकल्प राबविण्यात येत असून त्यातून या दोन्ही भागातील मागास आणि दुष्काळी भागात विकास केला जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिली.
विदर्भात वैनगंगा – पैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देऊन त्यातून ६१ टीएमसी पाणी उचलून दहा लाख हेक्टर दुष्काळी भागात असलेली जमीन ओलिताखाली आणली जात आहे, यातून ५५० किमी लांबीची एक नवी नदी तयार होत आहे. बळीराजा योजनेतून मराठवाडा, विदर्भ मधील ११० सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले त्यातील ६९ पूर्ण झाले , प्रधानमंत्री कृषी सिंचन सात प्रकल्प त्यातून गोसीखुर्द प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल. मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्यातून पाणी उचलून आणण्यासाठी सातत्याने पैसे उपलब्ध करून दिला आहे.
अमरावतीत टेक्सटाइल पार्क मध्ये आता केंद्राकडून दहा हजार कोटींची नवीन गुंतवणूक येत असून त्यातून दोन लाख नवीन रोजगार मिळणार आहे.संत्र्यासाठी क्लस्टर , मराठवाड्यात जालन्यात ड्राय पोर्ट, लातूर रेल कोच फॅक्टरीत वंदे भारत गाडीची निर्मिती करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाड्यात जालना बिदर रेल्वे लाईन, पुणे शिरूर ते छ संभाजीनगर ग्रीन फील्ड महामार्गाची निर्मिती हेही काम सुरू होत आहे. गडचिरोली जिल्हा भविष्यातील देशाची पोलाद निर्मिती राजधानी बनेल, हा जिल्हा हळूहळू नक्षल मुक्त होत आहे, येत्या तीन वर्षात संपूर्ण जिल्हा नक्षल मुक्त करण्याचा प्रयत्न.नक्षल कारवाईत शहीद झालेल्याच्या पाल्याला वर्ग एकची नोकरी देत आहोतअसं ते म्हणाले.
धानाच्या उत्पादकाला हेक्टरी वीस हजारांचा बोनस देत आहोत. सोयाबीनची खरेदी ५५० केंद्रावर खरेदी सुरू , २३.६८ लाख क्विंटल खरेदी झाली आहे . यापुढे मध्यप्रदेश च्या धर्तीवर कायमस्वरूपी खरेदी व्यवस्था करीत आहोत. कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव वाढवून दिला cci मार्फत केंद्र सुरू, मात्र खुल्या बाजारात भाव जास्त आहे. तुरीसाठी खुल्या बाजारात दर जास्त आहेत. संत्रा फळ गळतीसाठी मदत देत आहोत , १६५ कोटींची मदत दिली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. पीक विमा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सुरेश धस यांनी केलेली तक्रार लक्षात घेऊन त्याची सखोल चौकशी करावी लागेल त्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
माता बालक यांच्यासाठी नवसंजीवनी योजना , बालमृत्यू कमी झाले आहेत तरी आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. मुंबई गोवा महामार्ग युद्ध गतीने तयार करण्यात येत आहे. त्यातील सगळ्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यात येत आहे त्यामुळे सांगली , कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही असा अहवाल संबंधित तज्ञ समितीने दिला आहे. तरीही आणखी एक नवीन तज्ञ समिती नेमण्यात आली आहे, त्याचा अहवाल लवकर येईल , गरज पडल्यास इतर कायदेशीर मार्ग देखील अवलंबले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
ML/ML/PGB 21 Dec 2024