फडणवीस यांनी भाजप आणि आरएसएस संपवले, जरांगे यांची टीका…

 फडणवीस यांनी भाजप आणि आरएसएस संपवले, जरांगे यांची टीका…

जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देवेंद्र फडणवीस ने भाजप आणि आरएसएस संपवली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते बोलत होते. 30 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर रोजी कोणत्या मतदार संघात उमेदवार उभे करायचे या बाबतचा निर्णय जरांगे जाहीर करणार आहेत. जो काही निर्णय होईल तो समाजाच्या हिताचाच असेल असे जरांगे म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस केंद्रातील नेत्यांना फसवताहेत, त्यांनी केंद्रातील नेत्यांना सगळी खोटी माहिती दिलीय अशी टीका देखील जरांगे यांनी केलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कोणीच नाहीये असं सांगत धनगर खुश नाही, ओबीसी खुश नाही, आदिवासी खुश नाही असं जरांगे म्हणाले. राज्यातलं भाजप संपेल तर फक्त देवेंद्र फडणवीस मुळेच असं देखील जरांगे यांनी म्हटले. उद्यापासून 30 तारखेपर्यंत अंतरवाली सराटीत कोणीही भेटीसाठी येऊ नये असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे.

ML/ML/PGB
27 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *