शासकीय सोयाबीन खरेदीला मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासनाच्या हमीभावानुसार सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. खरेदीची मुदत रविवारी संपली. त्यानंतर सोमवारी मुदत वाढीचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाच्या अपर सचिवांनी जारी केला. सध्या फेडरेशनकडून २ लाख ७५ हजार ४५६ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. सोयाबीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे राबवण्यात जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १ ऑक्टोबरपासून नाफेडच्यावतीने शासनाच्या हमीभावानुसार सोयाबीनची खरेदी करण्यासाठी अकोला नोंदणी सुरू करण्यात आली. प्रक्रिया जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात आली. मात्र ऑक्टोबर महिन्यापासूनच खरेदी प्रक्रिया संथ गतीने राबवण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून येत असून, गत आठवड्यात तर बारादान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. अनेक केंद्रांवर दोन ते तीन दिवस खरेदी प्रक्रियाच बंद होती.
खरेदीची मुदत रविवारी संपली. जिल्ह्यात २८ हजार ८८८ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. खरेदीसाठी आतापर्यंत १५ हजार ९९४ जणांचे शेड्यूल्ड तयार करण्यात आले. आतापर्यंत १२ हजार २७६ शेतकऱ्यांकडून २ लाख ४५६ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.
शेतकऱ्यांची लूट थांबणार का खरेदीच्या मुदत वाढीचा आदेश जारी झाला तरी आर्द्रतेची अट मात्र कायम आहे. आर्द्रता १२ टक्केपेक्षा कमी असणे यासह अन्य अटींमुळे नोंदणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर आर्द्रता १५ टक्केपर्यंत वाढण्याचा आदेश केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी झाला. मात्र जिल्ह्यात आदेश आला नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले नाही. काही केंद्रांवर कमी आर्द्रतेचे सोयाबीन घेण्यासाठी २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटल उकळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून झाला. आता मुदतवाढ दिल्याने आर्द्रतेचा आदेश केव्हा जाहीर होईल असा सवाल उपस्थित होत आहे.
SL/ML/SL
14 Jan. 2025