जाहीरनाम्यांमध्ये पर्यावरणावर भर!

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, पाणी याच्याशी संबंधित मुद्द्यांसाठी दोन पाने राखून ठेवली आहेत. या दोन्ही पक्षांनी गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यांशी तुलना केली असता यंदा त्यांनी हवामान बदल, पर्यावरणीय शाश्वतता या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते.
दोन दशकांपूर्वी काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात पर्यावरण या विषयाबद्दल काही ओळीच असायच्या; पण आता हवामान बदल, पर्यावरणाचे झालेले नुकसान याबद्दल आता काही पाने असतात. हा बदल सुखावह आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले. पर्यावरणाच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांनी अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली, हे स्वागतार्ह आहे. या बद्दल विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेतील संशोधक देवादित्य सिन्हा यांनी सांगितले की, पर्यावरण धोरणाच्या काही बाबींमध्ये मोठ्या सुधारणा
होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबद्दल भाजपने आपल्या जाहीरनाम्यात काहीही उल्लेख केलेला नाही. वन आणि वन्यजीव रक्षण यासह काही बाबींमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय व राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने यात विरोधाभास आहे. त्यामुळे पर्यावरण व वने यांच्या रक्षणाबाबतची काही आश्वासने ही प्रतीकात्मक ठरली असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांना वाटते. भाजपने आपला ६९ पानांचा जाहीरनामा गेल्या शनिवारी प्रसिद्ध केला. त्यात तीन पाने पर्यावरण, हवामान बदल या विषयाला वाहिलेली आहेत. शाश्वत भारतासाठी मोदी यांची गॅरंटी या विभागात ही पाने समाविष्ट करण्यात आली आहेत.
Emphasis on the environment in the declarations!
ML/ML/PGB
18 Apr 2024