राज्य वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काल रात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप आज सरकारशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे.
आज संपकरी कर्मचारी संघटनांशी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली . तिन्ही कंपन्यांमधील विविध कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगार संघटना सामील असलेल्या या संपाबाबत फडणवीस यांनी
राज्य सरकारची भूमिका घोषीत केली ,त्यानुसार
कंपन्यांचे खाजगीकरण करायचे नाही, पुढील ३ वर्षांत ५० हजार कोटींची गुंतवणूक राज्य सरकार या तिन्ही कंपन्यांमध्ये करणार आहे असे फडणवीस म्हणाले.
आपली संपत्ती देण्याचा किंवा खाजगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही असे सांगून फडणवीस यांनी समांतर परवाना देण्याबाबत व्यवस्था आहे
नुकतीच एमईअरसीकडे एका खाजगी कंपनीने अर्ज दाखल केला आहे
याबाबत कामगार संघटनांची हरकत होती
त्याचा विपरित परिणाम सार्वजनिक कंपन्यांवर होईल असे म्हटले होते ,
एमईआरसीकडे आता सरकार हरकत नोंदवत आपली भूमिका मांडेल असेही त्यांनी सांगितले.
त्यासाठी जी आयुध आवश्यक आहेत ती वापरू, असे त्यांनी आश्वासित केले .
कंत्राटी कामगारांसंदर्भात अतिरिक्त ग्रेड देत वयात सूट देण्याची मागणी होती
त्याप्रमाणे विशेष बाब म्हणून या कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाईल,
कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे वेतन देण्यासाठी व्यवस्था उभारली जाईल,
त्यांच्या हिश्श्याचा एकही पैसा इतरांना वापरता येणार नाही असे फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.
या चर्चेनंतर महावितरण संघटनेचे मुख्य पदाधिकारी संजय ठाकूर यांनी संप मागे घेतला म्हणून सदरच्या बैठकीत जाहीर केले.
ML/KA/PGB
3 Jan 2022