देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू
जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील ४ राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलंय. ज्यावेळी या कायद्याचा मसुदा तयार होऊन जनतेसमोर ठेवला जाईल त्यावेळी यावर भाष्य केले जाईल असं दानवे यांनी सांगितलं.
ते जालन्यातील बदनापूरमध्ये बोलत होते. उद्या नवीन संसदेचं उदघाटन होत आहे.या सभागृहाचा प्रत्येकाने मान राखला पाहिजे.नवीन संसदेच्या उदघाटनाला विरोध करणं विरोधकांना शोभत नाही.पण विरोधक नवीन कुठला तरी मुद्दा काढून त्यावर चर्चा घडवून आणतात असा टोलाही दानवे यांनी विरोधकांना मारला आहे.
ML/KA/SL
27 May 2023