वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकावर परिणाम

 वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकावर परिणाम

बुलडाणा, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवले आहे. वातावरणातील बदलाचा तूर पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सोबतच मर या रोगानेही तुरीवर आक्रमण केल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभं असलेलं तुरीचे पीक जळून गेल आहे.Effects of Climate Change on Turmi Crop

नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या तुरीच्या पिकाची बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे तुरीच्या पिकाने आता माना टाकल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात उभं असलेले तुरीचे पीक जळून गेले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठा संकटात सापडला आहे.

कधी अतिवृष्टी तर कधी बाजार भाव न मिळाल्याने नाडला गेलेला शेतकरी पुन्हा एकदा तूर पिकाने धोका दिल्याने संकटात सापडलाय. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून कृषी विभागाने होईल ती मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी आता शेतकरी करू लागला आहे

ML/KA/PGB
05 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *