अवकाळी पावसामुळे ऐन मे महिन्यात जंगल झाले हिरवे

यवतमाळ, दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. एप्रिल महिन्यापासून ते पाऊस पडेपर्यंत संपूर्ण जंगलातील झाडे सुकून जातात. आणि ते दृश्य कोणालाही नकोस होऊन जातं. परंतु गेल्या पंधरा दिवसात चार-पाच वेळा अवकाळी पाऊस पडला. परिणामी कधी नव्हे ते मे महिन्यामध्ये संपूर्ण जंगल हिरव कंच झालेल आहे . यामुळे वाटसरूंना दिलासा मिळाला आहे.
ML/ML/SL
11 May 2024