बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे 9 हजार कंत्राटी कामगार संपात सहभागी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज सारख्या मुंबईतील 25 पैकी 21 आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुंबईतील हे कंत्राटी कर्मचारी सध्या आझाद मैदानात आंदोलनाला बसलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम सध्या सर्वसामान्य जनतेवर पाहायला मिळतोय. त्यामुळे आझाद मैदानात सरकारच्या वतीने आज शिवसेना पक्षाचे सचिव किरण पावसकर आणि इतर पदाधिकारी गेले होते. कामगारांच्या या आंदोलनासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांनी आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि लवकरच यावर तोडगा निघेल असा आश्वासन यावेळी पावसकर यांनी दिलं.
सध्या बेस्टमध्ये अंदाजे 9 हजार कंत्राटी कर्मचारी आहे. हे 9 हजार कर्मचारी संपावर असल्याचा दावा कंत्राची कर्मचारी संस्थेने केला आहे. यामध्ये एसएमटी एटीपीएल असोसिएटचे दोन हजार कंत्राटी कर्मचारी, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे तीन हजार कंत्राटी कर्मचारी, हंसा ग्रुपचे दीड हजार, टीएमएल ग्रुपचे दोन हजार ,ओलेक्ट्रा ग्रुपचे 500 इतके खाजगी कंत्राटी कर्मचारी आहेत. कंत्राटी कामगारांच्या संपाचा फटका घाटकोपर, देवनार, आणिक, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी आगार, सांताक्रुज आगार, मजास आगार या आगरांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान कंत्राटी कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहिल असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. Due to the strike of contract employees of BEST, citizens are suffering
ML/KA/PGB
3 Aug 2023