दिव्यांग वारकऱ्यांचा निघाला पंढरपूरला पायी पालखी सोहळा…

वाशीम दि ४:– आषाढी एकादशी म्हटलं की वेध लागतात वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे, हजारो नाहीतर लाखो वारकरी पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत टाळ मृदंगाच्या निनादात पंढरपुरात दाखल होत असतात, यंदा पहिल्यांदाच वाशीम येथील दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत. १५ दिव्यांग वारकरी ३५ दिवसात ४०० किलोमीटर पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरपूरला दाखल होणार आहेत.