साहित्य भारती पुरस्कारांचे वितरण
ठाणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती न्यासाच्या कोकण प्रांताकडून दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. कै. सदानंद त्रिंबक फणसे स्मृती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मिनल वसमतकर यांना त्यांच्या ‘वाडा’ या कादंबरीसाठी तर श्रीप्रकाश अधिकारी यांना ‘कथा मरूभूमीची’ या कादंबरीच्या अनुवादासाठी दिला जाणार आहे.
कै. नीलिमा नारायण फडके स्मृती काव्य पुरस्कार कवी गीतेश गजानन शिंदे यांना ‘चित्रलिपी’ या अनुवादित कविता संग्रहासाठी दिला जाणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. साहित्य भारती कोकण प्रांताच्यावतीने ठाण्यात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार वितरण 17 तारखेला ठाण्यात होणार्या साहित्यसम्मेलनाच्या समोराप सत्रात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
SL/KA/SL
14 Dec. 2023