अमृत भारत स्टेशन योजनेत राज्यात 126 रेल्वे स्थानकांचा विकास …

नागपूर, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे मंत्रालयाचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कामे केली जात असून तब्बल 126 रेल्वे स्थाकानकाचा विकास प्रगतीपथावर असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी आज सांगितले. बडनेरा – नागपुर रेल्वे मार्गाचे वार्षिक सुरक्षा निरीक्षण केल्यानंतर महाव्यवस्थापक यादव यांनी नागपूर विभागीय मंडळ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कामे पुढच्या वर्षी 2025 पर्यंत पुर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.. याशिवाय महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपुर, अजनी सह मोठया रेल्वे स्थानकांच्या रीडेव्हलपमेंटची कामेही केली जात असून 2026 पर्यंत ही सर्व कामे पूर्णत्वास जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले .. नागपूर विभागात आतापर्यंत 28 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकिंग सिस्टीम बसविण्यात आली असून भविष्यात यामध्ये वाढ केली जाणार आहे..
नागपुर – वर्धा रेल्वे मार्गाचा तिसऱ्या लाईंनचे काम मार्च 2025 पर्यन्त पूर्ण केले जाणार असून लवकरच चौथ्या लाईन चे काम सूरू करण्यात येणार असल्याचेही मध्य रेल्वे चे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी यावेळी सांगितले. Development of 126 railway stations in the state under Amrit Bharat Station Yojana.
ML/KA/PGB
Feb 2024