रस्त्यांच्या टेंडरची चौकशीची मागणी

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेने पुन्हा पुन्हा रस्त्यांची टेंडर काढून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे धोरण सुरूच ठेवले आहे. पुन्हा पुन्हा टेंडर काढूनही मुंबईतील नागरिकांना चांगले रस्ते मिळाले नाहीत. प्रशासकाची भूमिका काय आहे हे सर्वसामान्य नागरिकांना समजणे कठीण आहे. ज्या लोकांना टेंडर दिले आहेत ते कुणाच्या जवळचे आहेत ? असा सवाल करत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँगेस पक्ष कार्यालयात केली.
मुंबईमध्ये रस्त्यांची जी कामे केले जातात तो सर्व पैसा जनतेचा असून रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. माहितीच्या अधिकाराचा वापर करत आम्ही माहिती घेतली आहे. दहिसर मध्ये म्हात्रेवाडी या ठिकाणी पुन्हा त्याच रस्त्याचे टेंडर मागवण्यात आले आहे. नक्की रस्ता कोणी केला. पालिकाने केला की आमदार फंडातून केला. पहिल्या टेंडरची कामे झाली नसताना पुन्हा टेंडर काढण्याची गरज काय ?जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे ती थांबलीच पाहिजे यासाठी उद्या आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला आमदार अमीन पटेल, माजी नगरसेविका शितल म्हात्रे तसेच अश्रफ भाई आदी उपस्थित होते.
ML/KA/SL
5 March 2024