राज्यातील धरणांमध्ये आजमितीस सुमारे 38% इतका उपयुक्त पाणीसाठा

मुंबई दि २२:– राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे 2997 इतकी धरणे असून यावर्षीच्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्याअखेर(22 जून) या सर्व धरणांमध्ये सुमारे 38.03 टक्के इतका म्हणजेच 544.04 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या( सन २०२५) मे आणि जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये निश्चितच चांगला पाणीसाठा झालेला असल्याने व सध्या पडत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे . पावसाचे असेच प्रमाण व सातत्य राहिल्यास लवकरच सर्व धरणे शंभर टक्के भरू शकतील असा विश्वास देखिल चकोर यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात सहा(६) महसुली विभाग असून त्यापैकी
कोकण विभागात एकूण 173 धरणे असून त्यांमध्ये आजमीतीस सुमारे 59.92 टी.एम.सी.( 45.79%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
नाशिक विभागात 537 इतकी लहान-, मध्यम व मोठी धरणे असून त्यामध्ये आजमितीस 79.48 टीएमसी (37.92%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
पुणे विभागात एकूण 720 धरणे असून त्यामध्ये आज 219.56 टीएमसी (40.87)% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
मराठवाडा विभागामध्ये एकूण 920 धरणे असून त्यामध्ये आज सुमारे 81.85 टीएमसी ( 31.91)% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .
अमरावती विभागामध्ये 264 धरणे असून त्यामध्ये 52.14 टीएमसी ( 39.04%) आणि
नागपूर विभागात 383 धरणे असून या धरणांमध्ये 51.06 टीएमसी ( 31.39%) टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
सर्वात जास्त पाणीसाठा कोकण विभागात (45.79%) आणि त्या खालोखाल पुणे विभागात(40.87%) असून सर्वात कमी पाणीसाठा नागपूर विभागात(31.39%) असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे राज्यातील प्रमुख मोठ्या तीन (3 )
धरणांमधील एकूण एकत्रित पाणीसाठा खालील प्रमाणे आहे .
१)उजनी धरण एकुणसाठा- 104.62 टी.एम.सी.( 89.28% ) २) कोयना धरण— 36.56 टी.एम.सी.( 34.73%). ३)जायकवाडी धरण —51.05 टी.एम.सी. ( 49.70%) इतका पाणीसाठा आहे
तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या पाच(५) धरणांमध्ये सुमारे 5.71 टी.एम.सी. म्हणजेच 32.15% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात सुमारे 5.71 टीएमसी म्हणजेच 47.71% इतका पाणीसाठा आहे.
नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हेटवणे धरणात एकूण सुमारे 5.24 टी.एम.सी. म्हणजेच सरासरी 44.82% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे..
आज सर्वात जास्त पाऊस म्हणजे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी धरण येथे आतापर्यंत सुमारे 1333 मि. मी व नातुवाडी येथे 1368 मी.मी.इतका पाऊस नोंदविला गेला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या भंडारदरा धरणात सुमारे 4.50 टीएमसी (40.66%),निळवंडे धरणात 3.10 टीएमसी (37. 25%) मुळा धरणात 10.55 टीएमसी (40.57%), आढळा धरण-0.765 टीएमसी (72.17%) इतका एकूण पाणीसाठा झालेला आहे . संगमनेर तालुक्यातील निमोन- तळेगाव परिसराला काही अंशी संजीवनी असलेल्या भोजापुर धरणामध्ये कालपासून पाण्याची आवक सुरू झाली असून धरणात सुमारे 227 दशलक्षघनफूट म्हणजेच 62.88% टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे आपल्याशी असल्याचे देखील इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी सांगितले. ML/ML/MS