राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

 राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पहाटे पासून जोरदार वारे , विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे नव्याने पेरणी केलेल्या रब्बी पिकांचे आणि फळांचे अतोनात नुकसान झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात, मुंबई महानगर प्रदेशात , कोकणात , मराठवाड्यात ,खानदेशात नाशिक शहर आणि जिल्ह्यात दुपारपासून वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने दुपार पासून वीज पुरवठा बहुतांश ठिकाणी खंडित झाला आहे.

आज पहाटेपासूनच पावसाने अनेक ठिकाणी अवेळी धिंगाणा घातला आणि त्यामुळे आंबा , काजू , ऊस , कडधान्ये आदी रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुपारी ४:३० वाजल्यापासून ढगांच्या सावटामुळे गडद अंधार पडलेला होता. त्यातच अनेक ठिकाणी वीज गायब झाली त्यामुळे नागरिकांना दिवसाच अंधाराचा सामना करावा लागला. Damage to crops due to unseasonal rains in the state

ML/KA/PGB
26 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *