वादळी वाऱ्याने केळी पिकाचे नुकसान

अकोला, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकोल्याच्या अकोट तालुक्यातील रुईखेड, पणज, बोचरा या भागात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड आहे. परंतु, वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या केळीचे पीक कंपनीला आले आहे. मात्र वादळी वाऱ्याने केळीची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे होताचे पीक गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत. Damage to banana crop due to gale force winds
ML/ML/PGB
11 Apr 2024