दाभोळ खाडीपात्रात रात्रीच्या वेळेस संशयास्पद बोटींचा वावर…

रत्नागिरी, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दाभोळ खाडीपात्रातील केतकी आणि करंबवणे गावांमध्ये रात्रीच्या वेळेस संशयास्पद बोटींचा वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये संशयाचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या अंधारात अनेक बोटी मोठ्या प्रमाणात खाडीत घिरट्या घालत आहेत. अचानक अवजड बोटी मोठ्या प्रमाणात दिसल्यामुळे खाडी किनारपट्टी सुरक्षा प्रश्न निर्माण होत आहे. फिरत असलेल्या बोटी मच्छिमारांच्या नसल्याचा निर्वाळा स्थानिकांकडून दिला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तपास करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
ML/ML/PGB 9 Mar 2025