राज्यासमोर सध्या सायबर क्राईम चे मोठे आव्हान

 राज्यासमोर सध्या सायबर क्राईम चे मोठे आव्हान

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या मोठ्या प्रमाणात वाढणारे सायबर गुन्हे हे मोठं आव्हान असून त्यावर आळा घालण्यासाठी सायबर इंटेलिजन्स आणि सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे, तो येत्या सहा महिन्यांत तयार होईल , त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा शोध तातडीने घेता येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केलेली महिला आणि बालीकांवरील वाढते अत्याचार , तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे विषय यावर उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.नव्याने तयार होणाऱ्या सायबर प्लॅटफॉर्म वर बँका , पोलीस आणि संबधित कार्यालये एकत्र आणली जातील यातून गुन्ह्याची माहिती लगेच उपलब्ध करून घेता येईल असं त्यांनी सांगितलं.
यासाठी ४३ लॅब सध्या कार्यरत आहेत आणखी ही तयार करण्यात येत आहेत.

राज्यात अठरा हजार पोलिसांची भरती करण्यात येते आहे, कुठल्याही पोलिसांची कंत्राटी भरती होणार नाही. मात्र पोलीस महामंडळातील काही पोलिस अकरा महिन्यांसाठी घेणार आहोत , त्यासाठी कोणताही कंत्राटदार नेमणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पोलिस कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधाला मान्यता दिली आहे असं ते म्हणाले.
नक्षल भागात वेगाने पोलीस कारवाई होत असल्याने राज्यातील नक्षल भरती थांबली आहे, पलीकडच्या राज्यातून येणाऱ्या नक्षलवाद्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

महिला सुरक्षेसाठी महिला सहाय्यता कक्ष उभारण्यात आलेले आहेत , ८६ विशेष न्यायालये स्थापन केली आहेत , बाल लैंगिक गुन्ह्यांसाठी १३८ विशेष न्यायालये स्थापन करण्यात येत आहेत असं फडणवीस म्हणाले. यासाठीच्या विशेष संपर्क क्रमांकाचा प्रतुत्तर वेळ आठ मिनिटांवर आला आहे. गुन्हेगारांचे ठसे डिजिटल डेटा बेस पद्धतीने साठवले जातात त्यामुळे गुन्ह्यांचा तपास लवकर लागण्यास मदत होते आहे.

ML/KA/SL

1 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *