पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली ; शेतकरी हवालदिल

 पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली ; शेतकरी हवालदिल

बीड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे. Crops began to fail due to heavy rains; Farmer Havaldil जिल्ह्यात सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन , कापूस , मूग , उडीद पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. पिकेही जोमात आली होती . परंतु ३० दिवसापासून पावसाचा खंड पडला.

https://youtu.be/9pKg3iyi13M

यामुळे सोयाबीन , मूग , उडीद , कापूस , या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. डोंगरी आणि हलक्या जमिनीतील पिके आता करपू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे.
जिल्ह्यात एकूण ७ लाख ४३ हजार २०८ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र असून सर्वाधिक सोयाबीन ३ लाख २२ हजार ८६४ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

हलक्या जमिनीत पावसाची नितांत गरज असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच पावसाने दडी मारल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी पूर्ण होऊ शकलेली नाही. ११ जुलै पर्यंत कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ ६०.२ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. बीड, वडवणी, परळी, धारूर आष्टी आणि पाटोदा या तालुक्यात ६० मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी पंचनामा करून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

ML/KA/PGB
25 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *