प्राण्यांच्या गणनेसाठी पेंच व्याघ्रप्रकल्प सज्ज

नागपूर दि १२– बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या मंद प्रकाशात जंगलात प्राण्यांची गणना करण्यात येत असते. महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर अभयारण्य आणि उमरेड करांडला अभयारण्यात गणना करण्यासाठी पर्यटक, पशुप्रेमी यांच्यासाठी 120 मचाणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर रेंजमध्ये देखील गणना होणार असून अभयारण्याच्या विविध बफर रेंजमध्ये 76 मचाण स्थापन करण्यात आलेले आहे.
जेथे प्राणी येऊ शकतील त्यांची गणना करता येईल अश्या ठिकाणी पाणवठ्याजवळ, झाडांवर, रस्त्याच्या कडेला हे मचाण बांधण्यात आलेले आहे. गणना करीत असताना प्राण्यांच्या त्रास होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे. पशुप्रेमी, पर्यटक यांना प्राण्यांच्या नोंदी घेता यावे यासाठी त्यांना शीट देखील देण्यात आलेली आहे. दुपारी 3 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत वन्यजीवांच्या क्रियाकलाप आणि दृश्यांची नोंद घेतील.
ML/MS