वीज कंत्राटी कामगार कायम होण्याच्या प्रतिक्षेत

मुंबई, दि 15
2012 साली महावितरण कंपनीत 7000 विद्युत सहाय्यक पदाची भरती निघाली होती. या भरती मध्ये सर्व कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना त्याच पदावर सेवेत कायम करून घ्यावे अशी 5656/2012 याचिका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मा.मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. राज्यभरातील 1362 कामगार यात समाविष्ट आहेत.
मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही केस 13 वर्षे मा.ठाणे औद्योगिक न्यायालयात चालली या केस चा अंतिम निकाल हा 10 जून 2025 रोजी लागणार असल्याने वीज कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कंत्राटी कामगार क्षेत्रातील एतिहासिक निर्णय ठरू शकेल अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे .
ज्येष्ठ मार्गदर्शक मा.अण्णाजी देसाई यांचे संघटनेला मार्गदर्शन लाभले तर संघटनेच्या वतीने ऍड.विजय वैद्य यांनी 13 वर्ष कोर्टात बाजू मांडली. KK.MS