पूर्वोत्तर राज्यांमधील आजच्या स्थितीला केवळ काँग्रेसच जबाबदार

 पूर्वोत्तर राज्यांमधील आजच्या स्थितीला केवळ काँग्रेसच जबाबदार

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांनी लोकसभेत आणलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर काल दोन दिवस झालेल्या घमासान चर्चेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोडपणे विरोधकांना धारेवर धरले. जवळपास सव्वादोन तास चाललेल्या या भाषणात मोदी यांनी आपल्या विविध विकास कामांचे दाखले देत पूर्वोत्तर राज्यांमधील आजच्या स्थितीला केवळ काँग्रेसच जबाबदार असल्याचे ठाम प्रतिपादन केले. तसेच विरोधीपक्षांनी आणलेला हा अविश्वास दर्शक ठराव इष्टापत्तीच आहे,यामुळे सरकारची कामे जनतेसमोर सविस्तर मांडता आल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. ज्यांचे स्वत:चे हिशेब चुकलेत, तेही आमच्याकडून आमचा हिशेब मागत फिरतायत, असे म्हणत मोदींनी आपल्या नेहमीच्या ओघवत्या शैलीत मुद्देसुद मांडणी करत विरोधकांना चितपट केले.

ज्या राज्यातील परिस्थितीमुळे विरोधकांनी अविश्वास दर्शक ठराव आणला त्याबाबत बोलताना मोदी म्हणाले,

“मी मणिपूरच्या लोकांना, तिथल्या माता-भगिनींना सांगू इच्छितो की देश तुमच्यासोबत आहे. हे सभागृह तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून या संकटावर तोडगा काढू. तिथे पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. मणिपूर पुन्हा विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल. त्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही.”

मोदी पुढे म्हणाले की, “मणिपूरमध्ये कोर्टाचा एक निर्णय आला. तिथे काय होतंय हे आपल्याला माहिती आहे. तिथे जी परिस्थिती निर्माण झाली, हिंसाचार उसळला, त्यात अनेक कुटुंबांना त्रास झाला. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. महिलांबाबत गंभीर अपराध झाले. हे अपराध अक्षम्य आहेत. दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून प्रयत्न करत आहे. देशाच्या सर्व नागरिकांना मी आश्वस्त करू इच्छितो की नजीकच्या भविष्यात शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल. मणिपूर पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासानिशी पुढे जाईल.”

” या देशात मणिपूरपेक्षा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पण आपण एकत्र मिळून त्या समस्यांमधून मार्ग काढला आहे. त्यामुळे आपण एकत्र मिळून चालूयात आणि मणिपूरच्या लोकांना विश्वास देऊयात. राजकारणाचा खेळ करण्यासाठी मणिपूरच्या भूमिचा वापर करू नका. सत्ताधारी बाकांवरून या मुद्द्यावर समृद्ध चर्चा झाली.

LIC आणि HAL बद्दल विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, ” या लोकांनी देशातील बँकिंग क्षेत्राचे वाटोळे होईल असे म्हटले होते. त्यासाठी विदेशातून लोकांना आणले गेले. पण प्रत्यक्षात झाले उटले. सरकारी बँकांचा दुप्पटीने वाढला. दुसरे उदाहरण म्हणजे, सरंक्षण क्षेत्रातील हेलिकॉप्टर तयार करणारी कंपनी HAL होय. ही कंपनी बंद होणार आणि तेथील कामगारांच्या नोकऱ्या जातील असे सांगितले गेले. पण आज HAL एका नव्या उंचीवर पोहोचले आहे. तिसरे उदाहरण LICचे आहे. LICबद्दल काय काय बोलले गेले. देशातील गरीब लोकांचा पैसा उडत आहे, त्यांच्या कष्टाचे पैसे पाण्यात गेले असे बोलले गेले. पण आज LIC आणखी मजबूत झाली आहे.”

“ही इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. आता प्रत्येकजण नवरदेव बनू इच्छितो. सगळ्यांनाच पंतप्रधान बनायचं आहे. त्यांनी हाही विचार केला नाही की कोणत्या राज्यात कुणाबरोबर तुम्ही कुठे पोहोचला आहात? पश्चिम बंगालमध्ये तुम्ही तृणमूलसोबत आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात आहात. दिल्लीत एकत्र आहात.” असे म्हणत INDIA या नावाखाली एकत्र येत भाजपला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांना धारेवर धरले.

SL/KA/SL

10 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *