येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यामध्ये उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे गारठा वाढत आहे. आजपासून (दि. २४) राज्याच्या किमान तापमानात १ ते २ अंशांनी चढ किंवा उतार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्याच्या किमान तापमानात चढ – उतार होत असून, शनिवारी (दि. २३) मध्य, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान १२-१३ अंशांवर नोंदवले गेले. त्यामध्ये अहिल्यानगर १२.४, जळगाव १२.८, नाशिक १२.९, गोंदिया १२.५ यांचा समावेश आहे.

अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली नोंदवला जात आहे. केवळ कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे जात आहे.

ML/ML/PGB 25 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *