हवामानातील बदल साखरेच्या मुळावर

 हवामानातील बदल साखरेच्या मुळावर

पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख साखर उत्पादक राज्य आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम कालच आटोपला. या हंगामात हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे उसाची पुरेशी वाढ न झाल्यामुळे साखर उत्पादन घटले आहे.

१५ ऑक्टोबर ते १८ एप्रिल दरम्यानच्या यावर्षीच्या साखर गाळप हंगामात १०६ सहकारी आणि १०४ खासगी अशा २१० साखर कारखान्यांनी साखर उत्पादन केले आहे. २१० साखर कारखान्यांनी १०५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. मागील वर्षांपेक्षा ३२ लाख टनांनी साखर उत्पादन घटले आहे. राज्यात मागील वर्षी १३७.२८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षांएवढेच असल्यामुळे यंदा १३५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात साखर उत्पादन १०५ लाख टनांपर्यंतच होऊ शकले.

उत्पादन घटण्यास हवामानबदल कारणीभूत
यंदाच्या पावसाळय़ात जुलैअखेरपासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सतत पाऊस पडत होता. सततच्या पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. अपेक्षित वजन, गोडी भरली नाही. राज्यात गेल्या वर्षांएवढेच १४८७ लाख हेक्टरवर यंदाही ऊस होता. मात्र, नव्याने लागवड केलेल्या आणि खोडवा उसाचे वजन सरासरीच्या पंधरा ते वीस टक्के कमी भरले आहे. सोलापूर, बीड, उस्मानाबाद विभागात वजनात मोठी तूट आली आहे.

SL/KA/SL

19 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *