गांधी जयंती निमित्त राजभवन येथे स्वच्छता मोहीम

 गांधी जयंती निमित्त राजभवन येथे स्वच्छता मोहीम

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे दिवंगत नेत्यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

गांधी जयंतीनिमित्त आज राजभवन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्यपालांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. संपूर्ण वर्षभरात किमान १०० तास म्हणजेच आठवड्यात २ तास श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता ठेवण्याची यावेळी सर्वांनी शपथ घेतली.

आजच्या स्वच्छता अभियानात राजभवनातील कार्यालयांचा भाग, राजभवनचा समुद्रकिनारा, निवासी वसाहतीचा भाग तसेच देवीमंदिर परिसर श्रमदानाने स्वच्छ करण्यात आला.

ML/KA/SL

2 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *