बंगरुळुमध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल

बंगळुरु, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IT हब म्हणून प्रसिद्ध असलेले बंगळुरु शहर सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहे. उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच ही परिस्थिती ओढवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
बंगळुरूमधील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हांडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बेंगळुरूमध्ये १४ हजार ७०० पैकी ६ हजार ९९७ बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या महिन्यांत येथील जलसंकट संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बेंगळुरू पाणीपुरवठा विभागाच्या मते शहराला पाणीपुरवठा ५० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. कारण धरणात आता कमी पाणीराहिले असून पुढील काही दिवस पाण्याचे नियोजन करायचे आहे.
या प्रदेशात अपुऱ्या पावसामुळे कावेरी नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे.अधिकाऱ्यांनी २५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाण्याची तूट नोंदवली आहे. अपुरा पाऊस, भूगर्भातील कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच भूजलाचे अतिशोषण हे पाणी टंचाईचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.बंगलोर पाणी पुरवठा मंडळ (BWSSB) ने सूचित केले की मध्यवर्ती भागात परिस्थिती व्यवस्थापित केली जाऊ शकते, शहराच्या बाहेरील भागात पाण्याचे संकट अधिक गंभीर आहे.
बंगळुरूमधील पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी, बंगळुरू पाणीपुरवठा मंडळ (BWSSB) फिल्टर बोअरवेल बसवण्याची आणि पुनर्संचयित तलावाच्या जवळ वॉटर प्लांट्स बांधण्याची योजना आखत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण चाचणीनंतर पाणी पुरवठा करण्यासाठी या सुविधा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
SL/ML/SL
10 March 2024