चीन झाला भारताचा नंबर 1 ट्रेडिंग पार्टनर

 चीन झाला भारताचा नंबर 1 ट्रेडिंग पार्टनर

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला मागे टाकून चीन टाकून भारताचा नंबर वन व्यापारी भागीदार बनला आहे. या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये सुमारे 9 लाख 87 हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे. गेल्या 5 वर्षात चीनमधून भारताची आयात 5 लाख 86 हजार कोटी रुपयांवरून सुमारे 8 लाख 48 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. पण या काळात निर्यात १.३९ लाख कोटींवरून १.३८ लाख कोटींवर आली आहे, म्हणजे भारताची व्यापार तूट जवळपास दीड पटीने वाढली आहे.भारताचा मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेसाठ हा मोठा धक्का आहे.

चीनच्या आधी भारताचा नंबर वन व्यापारी भागीदार अमेरिका होता, पण या वर्षी व्यापारात मोठी घसरण झाली आहे. या आर्थिक वर्षात भारत-अमेरिका आयातीत सुमारे 20% घट झाली आहे, तर निर्यात देखील 1.32% नी घसरली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चीनमधून स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू. चीन आणि अमेरिका यांच्याशिवाय रशिया आणि यूएई या दोन मोठ्या देशांवर भारताचे अवलंबित्व आहे.

कोलकाता येथे ‘Developed India@2047’ कार्यक्रमादरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनकडून होणाऱ्या वाढत्या आयातीबाबत सांगितले की, “हे फक्त सरकारच्या नियंत्रणात नाही, व्यापाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांचा त्यात मोठा वाटा आहे. यात सरकार नक्कीच मदत करेल.” ते हे करू शकतात पण काही क्षेत्र पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात नाहीत.”
भारताला स्मार्टफोन आणि ईव्हीचे उत्पादन केंद्र बनवायचे आहे मात्र यासाठी चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हनुसार, भारताने 2023-24 या आर्थिक वर्षात चीनकडून 35 हजार कोटी रुपयांचे दूरसंचार आणि स्मार्टफोनचे भाग आयात केले. बॅटरी आणि ईव्ही क्षेत्रातील भागांसह सुमारे 18 हजार कोटी रुपयांची आयात करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुमारे 31 हजार कोटी रुपयांचे लॅपटॉप आणि संगणकाचे सुटे भाग आयात करण्यात आले आहेत.

SL/ML/SL

18 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *