चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वारा आणि गारपीट

चंद्रपूर दि ४:- मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झालेली होती. या वातावरणात मागील दोन दिवसांपासून अचानक बदल झाला असून आज दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटी चा वर्षाव झाला. या गारपीटी मुळे आंबा आणि पालेभाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.