नीति आयोगाच्या बैठकीवर या पक्षांचा बहिष्कार

 नीति आयोगाच्या बैठकीवर या पक्षांचा बहिष्कार

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या नवीन सभागृहाच्या उद्घाटनावरून गेले काही मोदी सरकारवर विरोधीपक्षांकडून टिकेचा आणि बहिष्काराचा वर्षाव होत आहे. विविध प्रकारे विरोधी पक्ष मोदी सरकारला विरोध दर्शवत आहेत. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या नीति आयोगाच्या बैठकीवर काही पक्षांनी बहिष्कार टाकला. या बैठकीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बहिष्कार टाकला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) या देखील या बैठकीला उपस्थित नव्हत्या. त्याबरोबरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Maan), तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी देखील अनुपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते..

लोकसभेच्या निवडणुका वर्षभर असताना भाजप विरुद्ध मोट बांधण्यासाठी आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच रणनीतीचा भाग असून भाजपला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न होता. मात्र काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बैठकीला हजर होते.

नीती आयोगाच्या बैठकीत ‘विकसित भारत @२०४७- रोल ऑफ टीम इंडिया’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. कॉँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मात्र नीती आयोगावर टीका केली आहे.

जयराम रमेश म्हणाले, “पूर्वी नियोजन आयोग केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत होता. परंतु पंतप्रधान मोदींनी नीती आयोग आणून नियोजन आयोग रद्द केला. पंतप्रधान कार्यालयाचा अंग हा आयोग बनला आहे.”

केंद्रा सरकारने वटहुकुमा काढून दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेतले. त्यामुळे भाजपेतर पक्षांच्या पाठिंब्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशव्यापी दौरा करत आहेत. त्यांनी नुकतीच ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशुकमार या नेत्यांची भेट घेतली आहे.

SL/KA/SL

27 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *